Blogs | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

ग्राहक एक राजा




initiativesimg

    दैनंदिन आयुष्यात आपण कोणत्या ना कोणत्या वस्तू खरेदी करत असतो. या अर्थाने आपण सर्वजण एक ग्राहक आहोत. ही खरेदी किंवा सेवा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. जर आपण व्यावसायिक हेतूसाठी कोणतेही उत्पादन किंवा सेवा खरेदी केली असल्यास आपण ग्राहक होत नाही. ग्राहक संरक्षण कायदा 1986. ग्राहकांची फसवणूक होऊ नये व संरक्षण व्हाव यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. ग्राहक म्हणून लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे. 1. योग्य उत्पादन निवडताना योग्य किंमतीला घेण्याची खबरदारी घ्या 2. प्रमाणित वस्तू खरेदी करा. 3. वस्तूंवर आयएसआय चिन्ह (ISI Mark), कृषी उत्पादनांवर एजीमार्क (AGMARK), दागिन्यांवरील हॉलमार्क (Hallmark) इत्यादींची चिन्हे बघून घेणे आवश्यक आहे. 4. मूल्य, वजन, कालबाह्यता, तारखेची माहिती मिळविण्यासाठी लेबल काळजीपूर्वक वाचा. 5. कॅश मेमो, पावती, बिल व्यवसायिक विक्रेत्याकडून घेणे सर्वात महत्वाचे आहे. ग्राहकांचे सहा हक्क 1. सुरक्षेचा हक्क- कोणतीही वस्तू उत्पादन व सेवा ही सुरक्षित असावी व ही आरोग्यासाठी व जीवनासाठी हानिकारक नसावी. 2. माहितीचा हक्क - घटक, प्रमाण, गुणवत्ता, उत्पादनाची तारीख, कालबाह्य तारीख इत्यादींची माहिती उत्पादनाच्या पॅकेजिंगवर छापील स्वरूपात असणे आवश्यक आहे. जाहिराती अयोग्य, खोट्या, दिशाभूल, फसवणूक करणाऱ्या नसाव्यात. 3. निवड करण्याचा अधिकार- बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. 4. तुमचं म्हणणं मांडण्याचा हक्क- कोणतीही वस्तू व सेवा संबंधित यावरील त्रुटी असल्यास, त्या संबंधित विक्रेत्यास किंवा व्यापार यास संपर्क साधून यासंदर्भात तक्रार करू शकतात. ती व्यक्ती तक्रार घेण्यास नकार देत असल्यास, ग्राहक स्वतः ग्राहक मंचाकडे संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात. देशात तीन स्तरीय ग्राहक मंच आहेत. जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक मंच, राष्ट्रीय ग्राहक मंच. 5. तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क- जर ग्राहकाची तक्रार रास्त असल्यास निवारणाचा हक्क कायद्यानं ग्राहकाला दिला आहे. 6. ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार- ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे व तो त्यांचा अधिकारच आहे. कोणतीही वस्तू व सेवा संबंधित यावरील त्रुटी असल्यास, त्या संबंधित विक्रेत्यास किंवा व्यापारयास संपर्क साधून ग्राहक यासंदर्भात तक्रार करू शकतात. ती व्यक्ती तक्रार घेण्यास नकार देत असल्यास, ग्राहक स्वतः ग्राहक मंचाकडे संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात. देशात तीन स्तरीय ग्राहक मंच आहेत. जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक मंच, राष्ट्रीय ग्राहक मंच.स्वतः ग्राहक किंवा एखाद्या ग्राहकांचा मृत्यू झाल्यास त्याचा कायदेशीर वारस किंवा प्रतिनिधी, कोणतीही स्वयंसेवी ग्राहक संघटना, केंद्र किंवा राज्य सरकार तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकांनी तक्रार कशी नोंदवावी ? तक्रार लेखी स्वरूपात असणे आवश्यक आहे. ही तक्रार प्रतिबंधित व्यापार, सदोष उत्पादन, सेवेची कमतरता, असुरक्षित व धोकादायक वस्तू, निर्धारीत किरकोळ किंमतीपेक्षा (एम.आर.पी.) जास्त पैसे आकारल्यास, जाहिरात अयोग्य, खोटी, दिशाभूल, फसवणूक करणारी असल्यास, इत्यादी बाबींसाठी तक्रार केली जाऊ शकते. कारवाईची कारणे ज्या कारणावरून उद्भवली आहेत त्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. ऑनलाइन तक्रार करण्यासाठी ग्राहक मंच_वरील दर्शविलेल्या सूचनांचे पालन करावे. https://consumerhelpline.gov.in/ तक्रार नोंदवण्याकरिता आपल्याकडे उत्पादनासंबंधी तथ्य आणि तपशील असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ कॅश मेमो, पावती, बिल व्यवसायिक विक्रेत्याकडून घेणे व ते पुराव्यासाठी समर्थनार्थ दस्तऐवज जपून ठेवणे आवश्यक आहे. जर ग्राहकांनी केस जिंकल्यास त्या संदर्भात नुकसानभरपाईचा अधिकार ग्राहकांना आहे. इतर न्यायालयांच्या तुलनेत या केसचा निकाल त्वरित लागतो. सदरील सर्व माहिती चांगल्या हेतूने आणि केवळ सामान्य नागरीकांच्या माहितीसाठी प्रकाशित केली गेली आहे. लेखन- ऍड अलोका नाडकर्णी