डायल करा–११२ (राज्यात प्रथम)

मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय हे सर्वोत्तम डायल 112 सेवा देण्यासाठी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहेत.
संकटातील नागरिकाने पोलीस मदतीसाठी ११२ नंबर वर दूरध्वनी केल्यास त्यांची अचूक माहिती घेऊन त्याने सांगितलेल्या जागेवर कमीत कमी वेळेत पोलीस स्टाफ पोहचविणे व होणाऱ्या घटनांक्रमाची वेळेसह नोंदी संगणकात घेणे यासाठी शासनाने डायल ११२ नावाची महाराष्ट्र इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टम कार्यरत केलेली आहे. या यंत्रणेची यशस्वी अंमलबजावणी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस घटकाने महाराष्ट्र राज्याच्या सर्व पोलीस घटकांमध्ये कमीत कमी वेळेत पोलीस मदत पोहोचविण्याच्या सरासरी रिस्पॉन्स टाइम मध्ये प्रथम क्रमांक राखण्यात गेले ४ वर्ष सातत्य ठेवले आहे. हे सातत्य राखण्यासाठी या पोलीस घटकाने खालील प्रमाणे विशेष प्रयत्न्य घेतलेले आहेत.
१. दिवस व रात्रपाळी कर्तव्यकरिता प्रशिक्षित पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे सुपरवायझर नेमलेले आहेत.
२. डायल ११२ यंत्रणेवर कॉल्सची संख्या वाढल्याने डिस्पेंचर ची संख्या वाढविण्यात आली आहे.
३. कामाच्या दर्जा वाढवण्यासाठी डिस्पॅचर, रिस्पॉडर आणि सुपरवायझर यांना वारंवार प्रशिक्षण देऊन लवकरात लवकर कशी मदत मिळेल याबाबत मार्गदर्शन केले जाते.
४. कामात दिरंगाई दिसून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना समज देऊन संबंधित बीट मार्शल याचे खुलासे घेतले जातात त्यामुळे कामातील दिरंगाई नाहीशी होऊन प्रभावी नियंत्रण प्रस्थापित होण्यास मदत होते.
५. कमीत कमी वेळेत पीडितांना मदत पोहोचवणाऱ्या बीट मार्शल यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येते त्यामुळे त्यांचे मनोबल वाढवून कामात उत्साह निर्माण होतो.
६. डिस्पॅचरची संख्या वाढविल्याने पीसीसी आणि एसीसी वरून येणारे कॉल वेगवेगळ्या डिस्पेंचर यांच्या स्क्रीनवर ती येतात आणि पुढे जवळील बीट मार्शल यांना कॉल देण्यात मदत मिळते. त्यामुळे रिस्पॉन्स टाईम कमी होण्यास मदत होते व कमीत कमी वेळेत प्रभावी कार्यवाही घेणे शक्य होते.
७. नियंत्रण कक्षा मार्फत दिवसा व रात्रपाळीत कर्तव्यावर असणाऱ्या बीट मार्शल पेट्रोलिंग चा आढावा घेतला जातो. बीट मार्शल सातत्याने ट्रॅकिंग मध्ये राहतील याबाबत दक्षता घेतली जाते.